मुंबई – क्रुझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे वादाच्या भोवऱ्यात आहे. क्रुजवरील कारवाई प्रकरणामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक खुलासे झाले आहे. तर आज आर्यनची कारागृहातून सुटका होणार आहे.
यातच या प्रकणावरून समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मराठी माणसाला न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
या पत्रावर आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलतांना टोला लगावला आहे. ते म्हणाले,’होय मी हि मराठी माणूस होतो ना मग तुरुंगात का ठेवले. मला अडीच वर्ष तुरुंगात कशाला ठेवल ? असा टोला त्यांनी लगावला आहे.
ते पुढे म्हणाले, मोदी सरकार गुजरातमध्ये मुंद्रा बंदरावर सापडलेल्या ३० हजार कोटी रुपयांच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी २ ग्रॅम, ५ ग्रॅम ड्रग्जची जास्त चर्चा करत महाराष्ट्राची बदनामी करत आहे, असा आरोप भुजबळ यांनी केलाय. तसेच या प्रकरणात आर्यन खानला जामीन मिळालाय, तर त्याला पकडणारा अधिकारी कायद्याविरोधात काम केल्यानं कोर्टकचेऱ्या करत आहे, असं म्हणत भुजबळांनी मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला.