मुंबई – भारतात एक देश एक निवडणुक शक्य आहे. मोदी सरकार द्वारे संसदेचं विशेष अधिवेश बोलावले गेले याला घेऊन अनेक प्रकारचे अंदाज लावल्या जात आहे. या विशेष अधिवेशनात एक देश एक निवडणुक बिल जाहीर करण्यात येणार आहे. मोदी स्वःत या बिलाचे समर्थन करत आहे.
लोकसभेच्या निवडणूका लवकरच होणार आहे. त्या आधीच मोदी सरकार हे बिल आणण्याच्या प्रयत्न का करत आहे. देशासाठी हे का आवश्यक आहे, यावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सविस्तर चर्चा केली आहे.
मात्र, पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाला आता विरोधी पक्षातील नेत्यांनी विरोध दर्शविण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाकडून देखील याला कडाडून विरोध होताना दिसत आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील हाच मुद्दा पकडून भाजपला आव्हान दिलंय.
“मोदी सरकारला हे सगळं आता सुचत आहे. कारण यांच्या आता लक्षात आलं आहे की, आता सगळी राज्य हातातून जातील. एक एक करुन हे निवडणुका हारतील. हे त्यांना चांगलंच माहिती आहे. म्हणून हे सगळं सुरू केलं आहे.’ असं त्या यावेळी म्हणाल्या.
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “काल आणि आज इंडिया आघाडीची बैठक सुरू आहे. 28 पक्ष एकत्र आले आहेत. ही अत्यंत महत्वपूर्ण बैठक मुंबईत होत आहे. जे आम्हाला शिल्लक सेना म्हणून हिणवत होते. त्यांनी आता बोलायला सुरूवात केली आहे.
सगळे पत्रकार परिषद घेत आहेत. भाजप आणि शिंदेगट यांच्या टार्गेटवर फक्त उध्दव ठाकरे आहेत. लेकिन ये डर अच्छा लगा. ये डर होना चाहिए! उध्दव ठाकरे यांच्या ताकदीचा केंद्र आणि राज्य सरकारलाही अंदाज आला आहे.’ असा खोचक टोला देखील त्यांनी यावेळी लागवला.