यवतमाळ- सध्या राज्यभरात विविध ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे आपत्तीच्या घटना घडला आहेत. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून गावांमध्ये घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. अशातच यवतमाळ जिल्ह्यातही पाऊस जोरदार बरसतोय. अनेक गावांना पुराने वेढा घातला आहे. जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे 45 लोक अडकले आहेत. या अडकेलेल्या लोकांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बाहेर काढण्यात येणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे 45 लोक अडकले आहेत. आम्ही सातत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून आता तासभरात भारतीय हवाई दलाचे 2 हेलिकॉप्टर्स नागपुरात पोहोचतील आणि तेथून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लगेच…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 22, 2023
यवतमाळ जिल्ह्यातील पूरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकाॅप्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून म्हंटले आहे की, ‘यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे 45 लोक अडकले आहेत. आम्ही सातत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून आता तासभरात भारतीय हवाई दलाचे 2 हेलिकॉप्टर्स नागपुरात पोहोचतील आणि तेथून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लगेच महागावसाठी रवाना होतील. सुमारे 231 मिमी पाऊस येथे झाला आहे. माझे सहकारी मदनभाऊ येरावार सुद्धा संपर्कात आहेत. परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.’
#WATCH | Maharashtra: Severe waterlogging witnessed in Yavatmal due to incessant rain in the region. pic.twitter.com/3iARiiBfbI
— ANI (@ANI) July 22, 2023
दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यात मध्यरात्रीपासून विजांचा कडकडाटांसह पाऊस सुरु आहे. कमी कालावधीमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. यवतमाळमध्ये 236 मिलिमीटर, महागाव 231 मिमी, आर्णी 164 मिमी, घाटंजी 142 मिमी तर कळंब, दारव्हा दिग्रसमध्ये मिमी आणि इतर तालुक्यांमध्ये 90 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला असल्याची नोंद झाली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील वाघाडी नदीला पूर आला आहे. काठावर असलेल्या 50 ते 60 नागरिकांच्या घरात पूराचे पाणी शिरले आहे. नागरिकांच्या घरातील धान्य कपडे इतर साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. जीव वाचवण्यासाठी अनेकांनी घराच्या टेरेसचा, झाडांचा आसरा घेतला. बाधित नागरिकांना त्वरीत मदत पोहचवण्यात येत आहे. तर राज्य सरकारडून हेलिकाॅप्टरची व्यवस्था करून पूरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.