येत्या गाळप हंगामाची तयारी सुरु
संविदणे (प्रतिनिधी) – पराग ॲग्रो साखर कारखान्याचा गाळप हंगाम २०२०/२०२१ सिझनचे मिल रोलरचे पुजन कारखान्याचे अध्यक्ष यशवर्धन डहाके यांच्या शुभहस्ते करण्यात आले. पराग साखर कारखान्याने येत्या गाळप हंगामाची तयारी मिल रोलरचे पुजन करुन सुरुवात केली आहे.
गेल्या गाळप हंगामात दुष्काळामुळे ऊसाची कमतरता असूनही कारखान्याने ३ लाख ३५ हजार २२२ मे.टनाचे गाळप केले होते तर ३ लाख ७७ हजार ४७० क्विंटल साखरचे उत्पादन केले आहे. तर कारखान्याने आज अखेर २५०२ रुपये ऊसबील शेतकऱ्यांना दिले असून उर्वरीत असणारी रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा करणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष यशवर्धन डहाके यांनी सांगितले .
चालू वर्षी राज्य शासनाने १५ आँक्टोंबरपासून गाळपाला परवानगी दिली असल्याने गाळप हंगाम २०२०/ २०२१ मध्ये कारखान्याने ७ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी कारखान्याने चालू वर्षी ट्रिपलर सिस्टीम बसून ६ ऊस तोडणी यंत्र (हार्वेस्टर ), ३०० ट्रक / ट्रक्टर टोळ्या ,२०० ट्रक्टर जोड व ५० बैलगाडी भरण्याचे नियोजन केले असल्याची माहिती मुख्य शेतकी अधिकारी अंकुश आढाव यांनी दिली आहे .
यावेळी या कार्यक्रमासाठी चिफ इंजिनियर अशोक चोरघे ,चिफ केमिस्ट एस.एम.जाधव, फायनान्स मँनेजर डी.यु. वाबळे , सुरक्षा अधिकारी रत्नाकांत कुरवडे, स्टोअरकिपर ए.एस.लबडे, लेबर आँफिसर किशोर नेवसे, चिफ अकाऊन्टंट भगत, ईडीपी मँनेजर आर .पी.येवले,आदि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.