आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे कार्यकारी संचालक जोस ओराईव्ह यांचे मत
पुणे -भारतातील साखरेचा वाढता साठा आणि निर्यातीमुळे जागतिक दर सातत्याने कमी होत आहेत. जागतिक साखर बाजारासाठी ही चिंतेचे कारण ठरु शकते, असे मत आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे (आयएसओ) कार्यकारी संचालक जोस ओराईव्ह यांनी व्यक्त केले.
मांजरी येथील वसंतदादा साखर इन्स्टिट्युट मध्ये आंतरराष्ट्रीय साखर परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ओराईव्ह यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले की, आम्ही इराण, बांग्लादेश, म्यानमार, इंडोनेशिया आणि इतर देशांना भारतातून साखर आयत करण्याबाबत नेहमीच प्रोत्साहित करीत असतो. भारतात जेवढी साखर उपलब्ध होऊ शकते इतकी साखर जगात कुठल्याही देशात होत नाही.
जगातील विविध देशांमध्ये साखरेचे पदार्थ खाण्यावर ही मोठी बंधने आली आहेत. काही ठराविक देशांमध्ये तर गोड पदार्थ खूप कमी प्रमाणात बनविले जातात. त्यांचे पारंपरिक पदार्थ वेगळे असतात. त्याचा परिणाम सुद्धा मागणीवर होत आहे. त्याचबरोबर ब्राझील साखऱ्या देशात सुद्धा साखरचे उत्पादन होते. अमेरिकन खंडातील सगळे देश तेथूनच साखर घेत असतात, त्यामुळे भारतातून त्याठिकाणी साखर जात नाही.
भारतात साखरेच्या उत्पादनात 2010 पासून वाढ झाली आहे. या वर्षापासून आपल्याकडे अतिरिक्त साखरेची निर्मिती होऊ लागली आहे. त्यानंतर 2015-16 आणि 2016-17 पर्यत अतिरिक्त उत्पादन होत गेले. सध्या, सुरु असलेले साखर वर्ष हे देशातील साखर उत्पादनाच्या तुलनेत तुट वर्ष असण्याची शक्यता आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी उत्पादन होत आहे पण, आगामी काळात जागतिक बाजारपेठेतील साखरेची मागणी कमी होत
जाणार आहे.
गोड पदार्थ महाग होत नाही तोपर्यंत…
जागतिक पातळीवर जे गोड पदार्थ विकले जातात त्यांच्या किंमतीमध्ये जो पर्यंत सुधारणा होणार नाही तोपर्यत साखरेचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात वधारणार नाहीत त्यामुळे याबाबत भारताने आत्तापासून विचार करण्याची गरज आहे. जागतिक बाजारातील साखरेचे दर सुधारण्यास व स्थिर करण्यास मदत करण्यासाठी जर किमतींमध्ये लक्षणीय सुधारणा झाली तर बाजारपेठेत तूट वाढण्याची गरज आहे, असे जोस ओराईव्ह यांनी सांगितले.