नगर – कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता भाज्यांची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे दरही आवाक्यात आहेत. त्यातच कोथिंबीर, टोमॅटो, हिरवी मिरची आणि लिंबासह कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यांचे भावातही घसरण झाली.
घाऊक बाजारात टोमॅटोच्या 50 क्विंटलची आवक पुरेशी असते, मात्र बाजारात सध्या टोमॅटोच्या 61 ते 91 क्विंटलची आवक होत आहे. त्यामुळे त्यांचे दरही 5 ते 6 रुपये किलो झाले आहेत. किरकोळ बाजारातही यामुळे टॉमेटो 20 रुपये किलोमध्ये उपलब्ध आहेत. त्याच बरोबर कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढली असून त्याच्या भावातही घसरण होत आहे. तसेच, हिरव्या मिरचीच्या 28 ते 49 क्विंटल दररोज येत आहेत. त्यामुळे हिरवी मिरची 20 ते 24 रुपये किलो झाली आहे.
लिंबाच्या गाड्यांची आवक 41 ते 45 इतकी होत आहे. यामुळे घाऊक बाजारात लिंबू 25 रुपये किलो या दराने मिळत आहेत. कोथिंबिरीची आवकही सध्या वाढली आहे. त्यामुळे बाजारात कोथिंबिरीच्या आवक दररोज होत आहे. यात दररोज लाख कोथिंबिरीच्या जुड्यांची आवक नगर शहरासह परिसरातून होत आहे. त्यामुळे कोथिंबिरीची मोठी जुडी पाच ते 10 रुपये झाली आहे.