पुणे – निवडणुकीत मतदानासाठी कामगारांना गावात आणण्यात सर्वच राजकीय पक्ष पुढे असतात. हे कामगार तुमचा जयजयकार करण्यासाठी चालतात. मग अशा आपत्तीच्या काळात या कामगारांना त्यांच्या गावात विरोध का करता, असा सवाल रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला.
मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये अडकलेल्या राज्यातील मजूरांसाठी खोत यांनी आक्रमक पावित्रा धारण केला आहे. या मजूरांना गावात प्रवेश देण्यास विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधींचाही त्यांनी समाचार घेतला.
सरकार देशातील नागरिकांना परदेशातून विमानाने मायदेशात आणत आहे. तर राज्यातील परप्रांतीयांना रेल्वे आणि बसने पाठवत आहे. मग राज्यातील मजूरांना ही सवतीची भूमिका का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.