नगर (प्रतिनिधी) – देशाच्या उद्योगांत कामगार केंद्रस्थानी आहेत. त्यांच्यामुळेच उद्योग क्षेत्राला भरारी मिळते. कामगार हा देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचा घटक आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त स्वराज्य कामगार संघटनेच्यावतीने कंत्राटी व माथाडी कामगारांना सुमारे दीड लाखांच्या धनादेशाचे वाटप आमदार जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे, सेक्रेटरी आकाश दंडवते, अभिजित खोसे, राहुल जाधव, आयाज सय्यद, सचिन कांडेकर, वसीम शेख, अभिजित सांबारे, शरद थोरात, राम घुगे, सुनील देवकुळे, स्वप्निल खराडे, हर्षल बिटगळ, दीपक परभणे, निलेश शेवाळे, अविनाश कर्डिले आदी यावेळी उपस्थित होते.
गलांडे म्हणाले, एमआयडीसीमध्ये कामगारांचे प्रश्न मिटावेत म्हणून प्रामाणिक प्रयत्न केला. कामगार उद्योजक यांच्यात स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून समन्वय राहावा, उद्योगाला भरारी मिळावी, यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी आमदार जगताप यांचे पाठबळ मिळाले.