नगर (प्रतिनिधी) – कोणत्याही विकासकामांचा दर्जा राखला जाईल, याकडे त्या कामाच्या ठेकेदारांची लक्ष्य देण्याची गरज आहे. त्यासह ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीही विकासकामे करताना कोणत्याही राजकीय आडकाठीशिवाय ती पूर्ण होतील, याकडे लक्ष्य पुरवावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी केले.
वाळुंज (ता. नगर) येथे समाजमंदिराच्या विकासकामाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. ज्येष्ठ नेते महादेव शेळमकर, सरपंच लता शेळमकर, उपसरपंच विशाल घिगे, उपअभियंता झावरे, अनिता मोरे, ग्रामपंचायत सदस्य अमोल गायकवाड, अंकुश गायकवाड, मनोहर पवार उपस्थित होते.