नगर – शहराला जोडणाऱ्या रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे उपनगराच्या विकासाला चालना मिळाली आहे. पवननगर येथील नाल्यावरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. उपनगराला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. यासाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला. लवकरच या रस्त्याचे कामही मार्गी लागेल. उपनगराच्या विकासासाठी या भागातील नगरसेवक नेहमीच पाठपुरावा करत असतात, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
पवननगर येथील नाल्यावरील पुलाच्या कामाची पाहणी करताना आ. संग्राम जगताप, मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, बाळासाहेब बारस्कर, शिवाजी चव्हाण, निखिल वारे, सुनिल त्रिंबके, बाळासाहेब पवार, सुरेश चव्हाण, योगेश ठुबे, विजय भोसले, मच्छिंद्र वामन, सुनिल शेकटकर, संकेत शिंगटे, भारत शिंदे, अजित पारकर, सतीश ढवण, स्वप्निल ढवण, विलास ढवण, राजेंद्र तागड, लक्ष्मण जावळे, नितीन बारस्कर आदी उपस्थित होते.
यावेळी जगताप म्हणाले, शहराच्या सर्वांगिण विकासासाठी मी प्रयत्न करत आहे. दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून नागरिक नगर शहरामध्ये खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे शहरातील उद्योग धंद्यांना चालना मिळते. शहरातील डीपी रस्त्यासाठी शासन दरबारी निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. भिस्तबाग महाल ते भिस्तबाग चौक व प्रोफेसर कॉलनी चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. पक्षीय राजकारणाविरहित सर्वांना बरोबर घेऊन शहराच्या विकासाला चालना दिली आहे. शहराच्या सर्वच भागामध्ये विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे. यावेळी बारस्कर म्हणाले की, शहर व उपनगराला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याचे काम व्हावे, यासाठी आ.जगताप यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे या रस्त्याचे काम सुरु झाले आहे. प्रभागाच्या विकासाबरोबर शहरामध्ये विविध प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत.