Hemant Soren : झारखंडचे नवे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्या फ्लोअर टेस्टपूर्वी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विधानसभेत आपले मत मांडले. जमीन घोटाळ्यात ईडीने अटक केल्यानंतर हेमंत सोरेन पहिल्यांदाच बोलत होते. 23 मिनिटांच्या भाषणात हेमंत सोरेन यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आणि ते म्हणाले की, “मी अश्रू ढाळणार नाही. कारण त्यांना किंमत नाही. आम्ही डोकं टेकून चालायला शिकलो नाही. वेळ आल्यावर प्रत्येक उत्तर देईल,” असा इशारा हेमंत सोरेन यांनी दिला.
काय म्हणाले हेमंत सोरेन?
“विधानसभेला संबोधित करताना हेमंत सोरेन म्हणाले, ‘त्यांना वाटते की मला तुरुंगात टाकल्याने ते त्यांच्या योजनांमध्ये यशस्वी होतील. पण, हे झारखंड आहे. हे देशातील असे राज्य आहे, जिथे आदिवासी-दलित वर्गातील अगणित सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. ईडी, सीबीआय, आयकर यांना संवेदनशील प्रणाली म्हंटले जाते. कोट्यवधी रुपये कमवून परदेशात बसलेल्यांना त्यांना काही करता येत नाही. ते निष्पाप लोकांना लक्ष्य करतात.”
#WATCH | Former Jharkhand CM and JMM leader Hemant Soren addresses the State Assembly ahead of the Floor Test of CM Champai Soren’s government today.
He says, “…on the night of January 31, for the first time in the country, a CM was arrested…and I believe that Raj Bhavan was… pic.twitter.com/Feq2KB7tT8
— ANI (@ANI) February 5, 2024
हेमंत सोरेन पुढे म्हणाले, “माझ्यावरील आरोप निराधार आहेत. हिम्मत असेल तर साडेआठ एकर जमीन माझ्या नावावर असल्याची कागदपत्रे दाखवा. तसे झाले तर मी राजकारण सोडेल. राजकारण विसरून जा, मी झारखंड सोडेन. मी रडणार नाही. हे अश्रू योग्य वेळेसाठी वाचवून ठेवेन. तुम्हा लोकांसाठी अश्रूंची काहीच किंमत नाही. दलित, आदिवासींच्या अश्रूंची तुम्हाला काहीही किंमत नाही. वेळ आल्यानंतर आम्ही यांच्या एकेक प्रश्नाचं उत्तर योग्य प्रकारे देईल,” असा इशारा त्यांनी दिला.
“३१ तारखेला रात्री देशात पहिल्यांदाच एखाद्या मुख्यमंत्र्याला अटक झाली आहे. याआधी कुठल्या मुख्यमंत्र्याला अशा प्रकारे अटक झाल्याचे ऐकले नाही. या सगळ्या प्रकारात राज्यपालांचाही सहभाग आहे. एका आदिवासी मुख्यमंत्र्यानं पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करावा अशी भाजपची इच्छा नसल्याने त्यांनी हे घडू दिले नाही”, असा गंभीर आरोपही हेमंत सोरेन यांनी केला.