गुलजार यांनी मोदी सरकारवर केली खोचक टीका
नवी दिल्ली – सुधारित नागरिकत्व कायद्यावरून देशपातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील हिंसक वातवरण निर्मीती झाली आहे. त्यातच आता देशातील विविध राज्यांमध्ये या कायद्याला विरोध दर्शवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर गीतकार गुलजार यांनी केंद्र सरकारवर लक्ष्य करत टीका केली आहे.
आंधी आणि माचिस सारख्या सुप्रसिद्ध चित्रपटाचे निर्देशक गुलजार यांनी म्हटले की,’दिल्लीवाले कधी कुठला कायदा आणतील याचा अंदाज तुम्ही लावू शकत नाही.’ असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर शाब्दिक हल्ले केले.