राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे असंवेदनशील वक्तव्य
नवी दिल्ली : राजस्थानमध्ये मागच्या एका महिन्यात अनेक बालकांचा मृत्यू झाला आहे. यावरून भाजपने कॉंग्रेसवर जोरदार टीका केली होती. कारण राजस्थानमध्ये कॉंग्रेसची सत्ता आहे. त्यातच आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे या प्रकरणावरील असंवेदशनशील वक्तव्य समोर आले आहे. बालकांचा मृत्यू होणं यात काही नवं नाही देशात आणि राज्यात अशा घटना घडतच असतात असे वादग्रस्त वक्तव्य गेहलोत यांनी केले आहे.
Rajasthan CM on Kota child deaths: This year has least deaths in last 6 yrs. Even 1 child death is unfortunate.But thr hv been 1500,1300 deaths in a year in past,this year figure is 900.There are daily few deaths in every hospital in state&country,nothing new.Action being taken pic.twitter.com/86oSvPsGA3
— ANI (@ANI) December 28, 2019
राजस्थानमध्ये मागच्या आठवड्यात तब्बल 10 बालकांचा मृत्यू झाला त्यावरच बोलताना अशोक गहलोत यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांनी बालकांच्या मृत्युमध्ये काही नवीन नसल्याचे सांगत त्यांनी मागील सरकारच्या काळापेक्षा सध्याच्या सरकारच्या काळात बालकांचे मृत्यूचे प्रमाण घटले असल्याचेही म्हटले आहे. आकडेच बघायचे झाले तर गेल्या काही वर्षात दीड हजाराच्या वर बालकांचा मृत्यू झालेला आपण पाहिला आहे परंतू, यंदाच्या वर्षात केवळ 900 बालकांचा मृत्यू झाल्याचा दुजोरादेखील त्यांनी यावेळी दिला.
देशात आणि प्रत्येक राज्यातील हॉस्पिटलमध्ये दररोज चार-पाच मृत्यू तर होतच असतात यात काही नवीन नाही. परंतू, सध्या राज्यात काही बालकांचे मृत्यू झाले ते अत्यंत दुर्दैवीच आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही आपण दिले असल्याचे गेहलोत यांनी यावेळी म्हटले. तसेच राज्यातील बालकांच्या मृत्युदराचे प्रमाण आपण कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत असे सांगत गेहलोत यांनी ज्यावेळी आपण निरोगी राजस्थान म्हणालो त्याचवेळी त्यात मृत्यूचाही समावेश होतो असे त्यांनी म्हटले. दरम्यान, राज्यात काही दिवसांपासून 10 बालकांचा मृत्यू झाला त्यावरून राजकारण तापले आहे.