मुंबई – विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभाध्यक्ष पदाचा गुरूवारी राजीनामा दिला होता. यानंतर शुक्रवारी नाना पटोले यांची काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय उलथापालथाचे संकेत दिले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, आम्ही फासे पलटवणार, शिडीशिवाय आम्ही फासे पलटवू आणि हे फासे खूप मोठे असतील, असे सूचक विधान त्यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या या विधानावरून सध्या राजकीय वर्तुळ पुन्हा एकदा भाजप ऑपरेशन लोटस होणार का ? अशी चर्चा रंगली आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी रविवारी सिंधुदुर्गात आहेत. शहा यांच्या पायगुणाने महाविकास आघाडी सरकार पडावे, असे विधान राणे यांनी शनिवारी केले. भाजप नेत्यांच्या या विधानावरून येत्या विधानसभाध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने मविआ सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस सुरु झाले असुन त्यांचा प्लॅन ए तयार आहे. तसेच येत्या काळात पुन्हा एकदा राज्याचा राजकारणात उलथापालट झाली आहे.