पिंपरी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दोन वर्षांच्या काळानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री होतील का याबाबत प्रत्रकारांनी विचारले असता, राज्यात महाविकास आघाडीचे तीन पक्षाचे सरकार बनवताना या सरकारचे नेतृत्व शिवसेनेकडे असेल ही गोष्ट सर्वांनी एकमताने मान्य केल्याची माहिती त्यांनी दिली.
शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि कॉंग्रेस अशा तीनही पक्षांनी सरकार बनविण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी या सरकारचे नेतृत्व शिवसनेकडे असेल ही गोष्ट सर्वांनी मान्य केली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आता दुसरी कोणी व्यक्ती त्या ठिकाणी येण्याचा विषय नाही.
फडणवीसांना सत्तेशिवाय चैन नाही
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी वसुली करण्यासाठी कोणती चिप आहे ते एकदा दाखवावे. ही चिप कशी असते, त्यातून वसुली कशी होते हे सांगावे. त्यामधून आमच्याही ज्ञानात भर पडेल. जी व्यक्ती पाच वर्ष मुख्यमंत्री असते, त्यांनी टीका करताना काही पथ्य पाळावी. त्यांना अजूनही ते मुख्यमंत्री असल्याचे वाटत आहे. त्यांना सत्ता मिळाल्याशिवाय चैन पडणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.