मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात विरोधकांकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचेही नाव घेतले जात आहे. अशातच भाजप नेत्यांनी वाझे यांच्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी मनसुख हिरेन यांचा शव – विच्छेदनावरून शंका उपस्थित केली आहे.
शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सगळ्या महत्वाच्या केसेस सचिन वाझे यांच्याकडेच कशा?
आशिष शेलार म्हणाले,’ हिरेन मृत्यू प्रकरणात सरकारचा चौकशीचा फेरा आणि दिशा याबाबत संशय वाढत आहे. त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी एनआयएकडे दिली जावी. कारण हिरेन मृत्यूप्रकरणात सचिन वाझे यांचा भोवती संशयाची सूई फिरत आहे. असं असताना ते ठाण्यात पोस्टमार्टमच्या ठिकाणी हजर का आहेत? असं प्रश्न उपस्थिती करत त्यांनी या प्रकरणाची चौकशी एनआयएकडे दिली जावी. अशी मागणीही शेलार यांनी केली आहे.
दरम्यन, मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथे कळवा खाडीत सकाळी साडे दहाच्या सुमारास सापडला. ते गुरूवार सायंकाळपासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबियांनी ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन हे पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या संपर्कात होते, असा आरोप केला होता. हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. वाझे यांनी आपण हिरेन यांना भेटले असू शकतो पण आपल्याला नेमकेपणाने आठवत नसल्याचे सांगितले होते.