सोलापूर – शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी मीडियाशी संवाद साधतांना वंचित आणि शिवसेनेच्या युतीमुळेच महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधतांना ते म्हणाले, सध्या देशाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गरज आहे. ते सक्षमपणे नेतृत्व करत आहेत. मात्र भविष्यामध्ये निश्चितच पंतप्रधान पदाच्या खुर्चीला न्याय देण्याची क्षमता आणि शक्ती नितीन गडकरी यांच्यामध्येच आहे, असं मोठं विधान त्यांनी केल आहे.
दरम्यान, सी व्होटरचा सर्व्हे आला आहे. त्यात भाजप विरोधात जनमत असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही हेच पुन्हा सांगितलं. त्यावरही शहाजी बापू पाटील यांनी मत व्यक्त केलं. भाजपा विरोधात जनमत आहे, हे शरद पवार साहेबांचं मत व्यक्तिश: आपणास मान्य नाही. भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या कारभाराबाबत जनता समाधानी आणि सुखी आहे, असा दावा शहाजी बापू पाटील यांनी केला.