नवी दिल्ली – देशात उच्च न्यायालये आणि विविध लवादांच्या जागा रिक्त असून त्या जागा भरण्यावर केंद्र सरकार लक्ष का देत नाही असा सवाल कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी केला आहे. या जागा भरण्यासाठी केंद्र सरकार आपल्या विचारसरणीचे लोक शोधत आहे त्यामुळेच हा विलंब होत आहे असा याचा अर्थ घ्यायचा काय असा सवाल त्यांनी केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या एकूण मंजुर पोस्ट 1080 आहेत त्यातील तब्बल 416 जागा रिक्त आहेत. डीआरटी, एनसीएलएटी, टीडीएसएटी अशा ठिकाणच्या लवादावरही अध्यक्ष किंवा प्रमुख भरले गेलेले नाहीत.
मोदी सरकार गेले सात वर्ष सत्तेवर आहे पण त्यांना अजून या रिक्त जागा भरता आलेल्या नाहीत. या जागांसाठी योग्य व्यक्तींची देशात कमतरता नाही. पण तरीही या जागा भरल्या जात नाहींत याचा अर्थ त्यांना त्यांच्या विचारसरणीची माणसे सापडत नाहीत हे त्याचे मुख्य कारण आहे असेहीं चिदंबरम यांनी म्हटले आहे.