पुणे- राज्याने मास्कबंदी उठवली असली, तरी गेल्या आठवड्यापासून करोनाच्या नवीन आणि सक्रीय रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे “मास्क लावला तर हरकत काय?’ असा प्रश्न विचारला जात आहे. बाधित संख्या वाढली, तर पुन्हा एकदा मास्कसक्ती आणि अन्य सुरक्षाविषयक सक्ती करावी लागेल असे सुतोवाच राज्य आरोग्य विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
बाधितांची वाढ लक्षात घेता राज्य सरकारने मास्क अनिवार्यतेबाबत निर्णय घेतलेला नाही. मात्र, पुढील चार-पाच दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. गेल्या आठ दिवसांत सक्रीय बाधितांमध्ये 50 टक्के वाढ झाली आहे. तर पॉझिटिव्हिटी दर 0.07 टक्के झाला आहे. आरोग्य विभागाने आता सर्व जिल्हे आणि महामंडळांना निर्देश दिले आहेत की, पॉझिटिव्ह 0.8% किंवा त्यापेक्षा जास्त नोंदवलेल्या सर्व संशयितांचा समावेश करण्यासाठी चाचणी तात्काळ वाढवावी.
मागील आठवड्यात अकोला 1.2%, मुंबई 1%, परभणी 1.2%, पुणे 1.5%, सिंधुदुर्ग 1.3%, धुळे 4.5%. हा सरासरी पॉझिटिव्हिटी दर 0.7% इतका आहे. यात 1 लाख 70 हजार 575 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी 1,117 नवीन प्रकरणांची नोंद झाली.
पुढील 4 ते 5 दिवसांत बाधितांची संख्या कशी वाढते ते पाहू, त्यावर मास्क अनिवार्य करायचे असल्यास योग्य अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात
येईल. परंतु नागरिकांनी मास्क वापरावाच असा सल्ला मी त्यांना देईन.
– प्रदीप व्यास, प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग
सध्या केवळ मुंबईत आठवड्यातून काहीच सक्रीय रुग्णसंख्या वाढ नोंदवली जात आहे. तथापि आम्ही सर्व जिल्ह्यांना चाचण्या वाढवण्याच्या आणि रुग्णालयात दाखल होण्याचा तसेच रुग्णवाढीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता हॉस्पिटलायझेशनबद्दल अधिक विचार सुरू आहे. – डॉ. प्रदीप आवटे, साथरोग विभागप्रमुख