पुणे – राज्यात काही भागात पाऊस कमी अधिक प्रमाणात सुरु आहे मात्र काही भागात पावसाने पाठ फिरवली आहे. अनेक भागातील शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. पावसाअभावी अनेक ठिकाणी शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. 31 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात पावसाची काय स्थिती असेल याबाबत हवामान विभागाने माहिती दिली आहे. पुढील सात दिवसांत मध्य महाराष्ट्रसह पश्चिम आणि दक्षिण भारतात या भागांमध्ये पावसाची शक्यता कमी आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गेल्या 10-12 दिवसात मराठवाडा भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात विदर्भ आणि सलग्न मराठवाडा जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर, 25 ते 31 ऑगस्ट या काळात विदर्भ, कोकण, मध्य प्रदेश, ओडीशा, छत्तीसगड या भागातही पावसाच्या सरी पाहायला मिळतील. त्याशिवाय मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात सरासरी इतका पाऊस किंवा मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे.
11 Aug, महाराष्ट्र पाउस 18-24 मध्ये, विदर्भ व सलग्न मराठवाडा जिल्ह्यांत काही ठिकाणी शक्यता.
25-31 ऑगस्ट, विदर्भ, कोंकण, मध्य प्रदेश, ओडीशा, छत्तीसगड…भागात.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा सरासरी इतका, किंवा कमी☔⛅
मोठ्या पावसाची शक्यता कमी. pic.twitter.com/G7jx0rR1fz— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 11, 2023
मराठवाड्यात पावसाची प्रतिक्षा –
नांदेड वगळता मराठवाड्यात सातही जिल्ह्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. मागील 60 दिवसांत फक्त 37.8 टक्के पाऊस झाला आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. मराठवाड्यात मागील 60 दिवसांत फक्त 37.8 टक्के पाऊस झाला आहे. गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. पुढील काही दिवस पावसाने हजेरी न लावल्यास शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
11 Aug, पुढील 7 दिवसांत मध्य (महाराष्ट्रसहीत), पश्चिम आणि दक्षिण भारतात या भागांमध्ये पावसाची शक्यता कमी आहे.
IMD
मराठवाडा भागात पावसाचे प्रमाण गेल्या 10-12 दिवसात अल्प आहे. कृषीसाठी काळजीचा विषय.— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 11, 2023