येथील ज्ञानविकास मंडळाचे आयोजित गीता पाठांतर स्पर्धेत आबासाहेब चिरमुले विद्यामंदिराने प्रथम क्रमांकाची पार्थसारथी ढाल बक्षीस पटकावले. पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम समर्थ सदन येथे साजरा झाला. सातारा शहरातील आंतर शालेय गीता पाठांतर स्पर्धेत यावर्षी एकूण २४०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
ज्या शाळेचे विद्यार्थी हे जास्तीत जास्त बक्षिसे मिळवतात, त्या शाळेला पार्थसारथी फिरती ढाल दरवर्षी दिली जाते. यावर्षी प्रथम क्रमांकाची पार्थसारथी ढाल ही आबासाहेब चिरमुले विद्यामंदिरला मिळाली दुसऱ्या क्रमांकाची दत्त महाराज कवीश्वर ढाल अण्णासाहेब राजे भोसले शाळेला मिळाली. तिसरा क्रमांक नवीन मराठी शाळेने पटकावला.
यावर्षी या गीता पाठांतर स्पर्धेत एकूण 550 बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यामध्ये सातत्य मध्ये संपूर्ण गीता पाठांतर मध्ये पाच विद्यार्थ्यांनी विशेष पारितोषिके मिळवली. ज्ञानविकास मंडळ आणि विवेकशास्त्री गोडबोले यांच्या श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळेच्या वतीने रोख बक्षिसांचे वाटप करण्यात आले.
मयंक बेदरकर, ओवी पवार, शरण्या नाळे, सौ वनिता जाधव आणि दीपक वाळींबे या पाच स्पर्धकांनी संपूर्ण गीता पाठ करून एक विक्रम प्रस्थापित केला. तसेच सहा अध्याय मध्ये दहा स्पर्धक नऊ अध्याय मध्ये पाच स्पर्धक आणि बारा अध्यायी मध्ये दोन जणांनी विशेष पारितोषिके मिळवली. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुरेश गायकवाड आणि अनंत जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. वैदेही कुलकर्णी यांनी केले. पद्माकर पाठकजी यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर आणि कार्याध्यक्ष प्रसाद चाफेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.