गयाना – भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी-20 सामन्याच्या आधी पाऊस झाल्याने मैदान ओले असल्याने सामना उशिराने सुरू होणार आहे. ताज्या माहितीनुसार पाऊस थांबला असून भारतीय प्रमाणवेळेनुसार 8.30 वाजता खेळपट्टीचे परीक्षण होणार असून सामन्याबदल निर्णय घेणार आहे.
UPDATE – It has stopped raining and the next inspection will take place at 11 AM local, 8.30 PM IST.#WIvIND pic.twitter.com/iaqO3vPBgI
— BCCI (@BCCI) August 6, 2019
दरम्यान, भारताने वेस्ट इंडिजविरूद्ध पहिले दोन सामने जिंकले आहे. त्यामुळे आजच्या अखेरच्या सामन्यात विजय प्राप्त करून भारताचे लक्ष्य निर्विवाद वर्चस्वाचे असणार आहे.
भारताला या मालिकेतील पहिल्या लढतीत विजयासाठी संघर्ष करावा लागला होता या सामन्यात भारताच्या मधल्या फळीतील अपयश पुन्हा दिसून आले होते. दुसरा सामना त्यांनी 22 धावांनी जिंकला होता. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला.