लंडन – कसोटी मालिका खेळण्यासाठी करोनाचा धोका असतानाही वेस्ट इंडिज संघाने इंग्लंडचा दौरा करण्याचा घेतलेला निर्णय धक्कादायक आहे, असे मत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अॅण्डरसन याने व्यक्त केले आहे.
जगभरात करोनाचा धोका अद्याप कायम आहे. अशा स्थितीत कोणताही संघ परदेशात जाऊन मालिका खेळण्याच्या मनस्थितीत नाही. परदेशात जाणे एकवेळ सोपे आहे. मात्र, मालिका खेळण्यापूर्वी 14 दिवस विलगीकरण कक्षात राहावे लागणार असल्याने वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या निर्णयाचे आश्चर्य वाटत आहे. ही मालिका 3 कसोटी सामन्यांची होत आहे. करोनाचा धोका असतानाही वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी तयारी कशी दर्शवली हेच समजत नाही. इंग्लंडमध्ये करोनामुळे हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले असून अद्याप परिस्थिती सामान्य झालेली नाही तरीही खेळाडू मालिका खेळण्यासाठी येथे दाखल झाले याचे आश्चर्य वाटते, असेही तो म्हणाला.