पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – निवडणूक रोख्यांसदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला खडे बोल सुनावून, या रोख्यांसदर्भातील माहिती देण्याचे आदेश दिले. कोणत्याही दबावाला बळी न पडता सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या या निःपक्षपाती भूमिकेचे पुणे विचार पीठातर्फे स्वागत करण्यात आले. पुणे विचार पीठातर्फे शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या चार नंबरच्या प्रवेशद्वारावर संविधानाच्या प्रतिमेचे पजून करून पेढे वाटप करण्यात आले.
या वेळी पुणे विचार पीठाचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र माळवदकर, भाई कात्रे, विठ्ठल गायकवाड, अॅड. रवींद्र रणसिंग, अॅड. संदीप ताम्हणकर, अॅड. मोहन वाडेकर, अॅड. प्रताप परदेशी, अॅड. शिवराज माळवदकर, अॅड. एकनाथ जावीर, अॅड. शारदा वाडेकर, राष्ट्रवादीचे गणेश नलावडे, रोहन पायगुडे, विजय खराडे, भालोसिंग अरोरा, अजिंक्य पालकर, योगेश पवार आदी उपस्थित होते.
या वेळी शिवाजीनगर न्यायालयाच्या फलकास झेंडुच्या फुलांचे तोरण बांधून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. संविधानाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भविष्यातही न्यायव्यवस्था कोणत्याही दबावाला बळी न पडता अशाच निःपक्षपातीपणे कर्तव्य बजावेल, असा विश्वास रवींद्र माळवदकर यांनी व्यक्त केला.