कर्जत: आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करावे असे आवाहन करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. त्यानंतर मात्र हा विषय चर्चेचा विषय ठरला आहे. त्यावर महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. राष्टवादी काँग्रेसचे आमदार आमदार रोहित पवार यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पडळकरांच्या या भूमिकेचे रोहित पवार यांनी स्वागत केले आहे. मात्र नामांतराच्या बाबतीत तिथल्या लोकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे तसेच त्या शहराच्या विकासावर बोलाने देखील गरजेचे आहे असे म्हणत त्यांनी पाडळकरांना खोचक टोला लगावला आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, ” कोणत्याही भागाचे, शहराचे ,जिल्ह्याचे नाव बदलण्यासाठी थोर व्यक्तींचे नाव पुढे येत असेल तर ही बाबा स्वागत करण्यासारखी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासाठी पुढाकार घेत असतील तर चांगली गोष्ट आहे. पण हे करत असताना तिथल्या लोकांना विश्वासात घेणं महत्त्वाचं आहे. सामान्य लोकांना विश्वासात घेऊन जो निर्णय घेतील त्याचं सर्वांनी स्वागत केलं पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्याला काय विचार दिले की, सामान्य लोकांच्या हितासाठी काम केलं पाहिजे. चांगेल रस्ते असावेत, पिण्याचं पाणी चांगलं असावं, धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. हे विचार स्वीकारुन त्यांनी दिलेला मार्ग असो किंवा इतर थोर व्यक्तींनी दिलेला मार्ग आत्मसात करुन काम करणं हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.” अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.
हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे 'अहमदनगर' नाव बदलून 'अहिल्यादेवी नगर' करण्यात यावे.नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल.जय अहिल्या,जय मल्हार…@CMOMaharashtra pic.twitter.com/51xIYlvp5U
— Gopichand Padalkar (Modi Ka Parivar) (@GopichandP_MLC) June 2, 2022
काय आहे गोपीचंद पडळकरांची मागणी ?
हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘अहिल्यादेवी नगर’ करण्यात यावे. अशी मागणी करणारे पत्र पडळकर यांनी मुख्यमंतत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. शिवाय याबाबत त्यांनी एक ट्विटही केले आहे. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, ” हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘अहिल्यादेवी नगर’ करण्यात यावे.नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल.जय अहिल्या,जय मल्हार…” आता यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.