मुंबई – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. राज्यामध्ये मोठं मोठ्या घडामोडी सुरु असताना आता भारत जोडो यात्रा देखील आपल्या पुढच्या प्रवासाला निघणार आहे.या यात्रेमध्ये संजय राऊत दिसले नसले तरी राहुल गांधी यांनी राऊतांना फोन करून त्यांची विचारपूस केल्याचे समजते.
संजय राऊत यांनी स्वतः ट्विट करत राहुल गांधी यांनी आपल्याला फोन केल्याचे म्हंटले आहे. “भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी रात्री फोन करुनमाझ्या प्रकृतीची विचारपूस केली” अशी माहिती संजय राऊत यांनी ट्विटद्वारे दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते पुढे म्हणतात,आम्हाला तुमची चिंता होती. असे ते म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दू:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे.यात्रेत तो दिसतोय”.
भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी रात्री फोन करुन
माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती. असे म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दू:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा
ओलावा संपला आहे.यात्रेत तो दिसतोय..— Sanjay Raut (@rautsanjay61) November 21, 2022
भारत जोडो यात्रेदरम्यान आदित्य ठाकरेंसह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यादरम्यान राऊतांना नुकताच जामीन मिळाला होता तसेच प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना या यात्रेत सामील होता आलं नव्हत. आता राहुल गांधींनी स्वतः फोनवरून त्यांच्याशी सवांद साधला आहे.