नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात बुरखेधारी गुंडांच्या टोळीने रविवारी हल्ला चढवला. हा प्रकारच एवढा भयानक होता की 72 तास उलटल्यानंतरही उर्दूचे प्राध्यापक शिव प्रकाश यांच्या पत्नी सुनिता प्रकाश आजपर्यंत नीट झोपू शकल्या नाहीत. त्या म्हणातात, दाराबाहेर झालेला छोटासा आवाजही मला खूप घाबरे करतो. मी सुरक्षित नाही याची जाणीव करून देतो.
शिवप्रकाश त्याची पत्नी आणि 12, 8 आणि दीड वर्षाच्या मुलासह प्राध्यापकांच्या निवासस्थानात राहतात. बुरखेधारी गुंडांच्या टोळीने रविवारी रॉड आणि लाठ्या आणि घण घेऊन विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केला. त्यांनी प्राध्यापक आणि शिक्षकांवर हल्ला चढवला. त्यात 34 जण जबर जखमी झाले. त्यांच्यावर एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार करण्यात आले.
साबरमती आणि पेरीयार वसतीगृहावर जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर प्राध्यापकांची निवासस्थाने असणाऱ्या ट्रन्सीट हाऊसकडे हल्लेखोरांनी मोर्चा वळवला.
सुनिता सांगत होत्या, मी खिडकीतून पहात होते. हातात रॉड, स्टीक आणि लाठ्या घेतलेल्या गुंडांच्या टोळीने अपार्टमेंटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
बुरखाधारी गुंडांच्या विरोधात प्रा. सुचित्रा सेन रस्त्यावर आल्या. त्यांच्यावर गुंडांनी सुरवातीला दगडफेक केली. त्यानंतर त्यांना लाठ्यांनी मारहाण केली. साबरमतीजवळ टी पॉईंटजवळ मी उभी होते. त्यांनी दगडफेक केली. तो दगड मलाही लागला. सुचित्रा या खाली पडल्या. त्यांच्यावर लाठ्यांनी हल्ला करण्यात आला, असे कला शाखेतील प्राध्यापिका शुक्ल सावंत यांनी सांगितले.
प्राध्यापक शिवप्रकाश म्हणाले, मी जेएनयुमध्ये 2005 मध्ये रूजू आलो. मास्टर्सचा विद्यार्थी होतो. त्यावेळी, या कॅम्पसमध्ये मी 145 वर्ष रहात आहे. मी अशी परिस्थिती कधीच पाहिली नाही. आम्ही तावावतावाने तात्विक वादविवाद घातले. मात्र असा हिंसाचार कधीच पाहिला नाही. हा जमाव प्राध्यापकांच्या निवासस्थानाजवळ जाइरल असे मला कधीच वाटले नव्हते. मला आता लक्षात आले आहे, की विद्यापीठाची सुरक्षा व्यवस्था भेकड आहे.
हा हिंसाचार सुरक्षा रक्षक मख्खपणे पहात उभे होते. विद्यापीठाच्या आवारात या गुंडांना प्रवेशच कसा मिळाला? असा सवाल करून प्राध्यापक म्हणाले, या घटनेत विद्यापीठातील काही जण सहभागी असल्याशिवाय या गुंडांचा हल्ला शक्य नाही.