पुणे – राजभवन हा राजकीय अड्डा बनून गेल्याची टीका राष्ट्रवादी नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केली होती. त्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून नवाब मलिक किंवा संजय राऊत यांच बोलणं लोकं फार गांभीर्यांने घेत नाहीत आम्हालाही घ्यावसे वाटतं नाही असा निशाणा त्यांनी साधला आहेत ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोतल होते.
प्रवीण दरेकर म्हणाले की, नवाब मलिक किंवा संजय राऊत यांचं बोलणं लोकं फार गांभीर्यांने घेत नाहीत आम्हालाही घ्यावसे वाटत नाही सकाळ, दुपार व संध्याकाळ माध्यमांसमोर आलं पाहीजे काहीतरी बोललं पाहीजे या भावनेतूनच त्यांचे वक्तव्य असतात.
धोरणात्मक लोकांशी निगडीत समस्यांविषयी किंवा एखाद्या विषयावर ते बोलत नाही. मराठवाड्यातील समस्यांवर राऊत व मलिक यांनी भूमिका मांडली का?, सरकार काय करते सांगितले का? सरकारने काय करावं हे सांगतील मात्र केंद्राकडे बोट दाखवून कारण राजकीय भूमिका सांगण्यात त्यांना खूप मजा वाटते. त्यामुळे केंद्र-राज्य, राज्य-राज्यपाल, भाजप-राज्यसरकार याभोवतीच त्यांचं राजकारण फिरत असतं त्यामुळे आम्ही त्यांना गांभिर्याने घेत नाही. असे दरेकर म्हणाले आहेत.