जळोची -शहरातील तीन हत्ती चौकालगतच्या नीरा डावा कालवा पुलावरील पाणी पुरवठ्याच्या दाब नलिका,वितरण नलिका नवीन पुलावरुन स्थानांतरीत करण्याचे काम करण्यात येत आहे. पाइपलाइन्स् पूर्ववत जोडण्याचे काम करण्यासाठी बराच वेळ लागणार असल्याने गुरुवार (दि.28) व शुक्रवार (दि.29) दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
शहरातील सिध्दार्थनगर, भीमनगर, चंद्रमणीनगर, विठ्ठलनगर, कोअरहाऊस, वडार सोसायटया, बडकेनगर, सटवाजीनगरसह संपूर्ण आमराई विभागात गुरुवार 28 रोजी तर विजयनगर, पोस्टरोड, जवाहरनगर, सिनेमारोड, महावीर पथ, बुरुडगल्ली, नेवसे
रोड,सिध्देश्वरगल्ली, कसबा गल्ली, सनगर गल्ली, श्रीराम गल्ली या भागातील पाणी पुरवठा शुक्रवार 29 रोजी बंद असणार आहे. नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून पाणी काटकसरीने वापरून नगरपालिकेत सहकार्य करण्याचे आवाहन महेश रोकडे यांनी
केले आहे.