मुंबई – महाराष्ट्रात मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू असून, त्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. मुंबईतील अनेक भागात पाणी साचले आहे, रस्ते गुडघाभर पाण्यात आहेत. त्यामुळे वाहनांची वाहतूक देखील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. शहरातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे अंधेरी, कुर्ला, घाटकोपर, चेंबूर आणि इतर काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले. भारतीय हवामान विभागाने या आठवड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
#WATCH मुंबई में भारी बारिश के कारण शहर के कई इलाकों में जलभराव हुआ।
(वीडियो चुनाभट्टी इलाके से है) pic.twitter.com/wvD6RUU7WE
— ANI_HindiNews (@AHindinews) July 21, 2023
सायनमध्ये दुपारी पाणी साचल्याने 12 हून अधिक मार्गांवर बेस्ट बसेस वळवल्या गेल्या असे एका अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय अंधेरी सबवे पाणी साचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर गाड्या सामान्यपणे धावत आहेत, तर प्रवाशांनी 10 ते 15 मिनिटे उशीर झाल्याची तक्रार केली आहे.
#WATCH मुंबई: भारी बारिश के कारण सड़कों पर जलभराव हुआ। (वीडियो सायन सर्कल से है) pic.twitter.com/tihnOQY9xW
— ANI_HindiNews (@AHindinews) July 21, 2023
येत्या काही तासांत मुसळधार पाऊस पडेल
भारतीय हवामान खात्याने दुपारी 1 वाजता जारी केलेल्या हवामानाच्या इशाऱ्यानुसार, पुढील तीन ते चार तासांत मुंबईत काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. BMC डेटानुसार सकाळी 8 वाजेपर्यंत म्हणजेच गेल्या 24 तासांमध्ये शहरात सरासरी 30 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर गुरुवारी जोरदार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता.
येत्या २४ तासांत जोरदार वारेही वाहतील
शुक्रवारी, IMD अधिकाऱ्यांनी मुंबई शहर आणि उपनगरात 24 तास अधूनमधून 45-55 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह मुसळधार पावसाची आणि मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.त्यामुळे पुढील एक ते दोन दिवस मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.