पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आळंदी येथे वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेला लाठीमार दुर्दैवी आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेबाबत काँग्रेस नेते नाना पाटोले यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
नाना पटोले म्हणाले,’शेकडो वर्ष चालत आलेल्या या वारकरी परंपरेला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने गालबोट लावलं आहे. ज्या पद्धतीने भोळ्याभाबड्या वारकऱ्यांवर लाठीचार्ज करवण्यात आला. त्या घटनेचा मी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करतो.’
नाना पाटोले यांचे ट्विट
दंगेखोरांना मोकाट सोडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणा-या शिंदे फडणवीसांचा धिक्कार. pic.twitter.com/FgXtpBuOdL
— Nana Patole (@NANA_PATOLE) June 11, 2023