वाघोली( प्रतिनिधी) – पीएमआरडीएने जाहीर केलेल्या विकास आराखड्याला वाडेबोल्हाई ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असून आराखड्यानुसार वाडेबोल्हाई येथील शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी आक्षेप नोंदविला असून बदल करण्याची मागणी केली आहे.
पुणे महानगर विकास प्राधिकरण विकास महामंडळ (पीएमआरडीए) ने जाहीर केलेल्या विकास आराखड्यानुसार नविन मेट्रो प्रकल्प समाविष्ट केलेला आहे परंतु यापुर्वीच राज्य शासनाने पुणे-नाशिक हायस्पिड रेल्वे व रिंग रोड असे दोन्ही प्रकल्प याच बाधित क्षेत्रालगतच प्रस्तावित केलेले असल्यामुळे बरेच शेतकरी बाधित होऊन भुमिहीन होत आहेत.
विकास आराखडा तयार करित असताना बाधित शेतक-यांचा विचार करुन आराखड्याला न्याय देणे आवश्यक आहे त्यामुळे प्रकल्पालगत लॉजिस्टीक झोन, कमर्शिअल झोन, रेसिडेनशिअल झोन, इंडस्ट्रीअल झोन घोषित करणेसाठी लगतच्या क्षेत्राचा विचार करुन त्याचा आराखड्यामध्ये समावेश करावा.
माजी उपसरपंच, ग्रामपंचायत म्हणतात…
पीएमआरडीए चा नकाशा मध्ये नवीन मेट्रो प्रकल्प समाविष्ट केलेला आहे परंतु यापुर्वीच राज्य शासनाने पुणे-नाशिक हायस्पिड रेल्वे व रिंग रोड असे दोन्ही प्रकल्प याच बाधित क्षेत्रालगतच प्रस्तावित केलेले असल्यामुळे बरेच शेतकरी बाधित होऊन भुमिहीन होत आहेत. बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पीएमआरडीए च्या वतीने नकाशात बदल करणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या हरकतींचा विचार करून बदल करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.
चंद्रकांत केसवड
माजी उपसरपंच, ग्रामपंचायत वाडेबोल्हाई