नवी दिल्ली – सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना गुरुवारी पार पडला. हा सामना भारताने ८ धावांनी जिंकला. या सामन्यानंतर विराट कोहलीने संघाच्या खेळाबद्दल आणि पंचाच्या निर्णयाबाबत आपली प्रतिक्रिया दिली. विराट म्हणाला कि, पंचांचे निर्णय सुद्धा एका खेळाडूप्रमाणे स्पष्ट असले पाहिजेत. त्यांना ही अधिकार असले पाहिजे की, मला ही पूर्णपणे समजले नाही.. असे म्हणण्याचे. असं विराट म्हणाला.
तसेच कोहली पुढे म्हाणाला, “एक टॉप संघाविरुद्द या प्रारुपातील हा प्रोपर सामना राहिला. मागील सर्व सामन्याच्या तुलनेत खेळपट्टी चांगली होती. या शिवाय दवाची भूमिका सुद्धा चांगली राहिली. खेळपट्टीने आम्हाला ही धावसंख्या बनवू दिली. मध्येच काही उदाहरण होती, जे विचित्र होते. परंतु आम्ही १८० पेक्षा जास्त धावा करण्याकडे बघत होतो.”
सूर्याचा विशेष उल्लेख करताना विराट म्हणाला,” त्याने इशान किशन प्रमाणे आपल्या पहिल्या सामन्यात शानदार फलंदाजी केली. तो आयपीएल मध्ये बिनधास्त खेळला आहे. यानंतर आमच्याकडे कोणताही टी-२० सामना नाही. त्यामुळे माझी इच्छा आहे की, लोकांनी आत्मविश्वास बाळगला पाहिजे आणि यातून जोरदारपणे बाहेर यायला हवे. आम्ही चेंडू बरोबर क्लिनिकल होतो.”
शार्दुल ठाकुर बद्दल बोलताना विराट म्हणाला,” त्याने सामना बदलला. परंतु दबावात आम्ही पावरप्लेच्या दरम्यान इंग्लंडच्या खेळाडूंना चेक करत होतो. कसोटी मालिकेतील एक किस्सा होता. जेव्हा मी जिंक्सच्या (अजिंक्य रहाणे ) बाजुला होतो. त्याने स्पष्टपणे चेंडू पकडला होता, मात्र त्याला विश्वास नव्हता आणि हे घेवून आम्ही तिसर्या पंचाकडे गेलो. हा एक सोपा पर्याय आहे की तुम्हाला शंका आहे, तर कोणता पर्याय नाही की, तो स्क्वेअर लेग कडून पंच याला स्पष्ट बघू शकेल.”
पंचाच्या बाबतीत विराट कोहलीने दिली प्रतिक्रिया
विराट कोहली म्हणाला की,” क्षेत्ररक्षक जसा म्हणू शकतो की मला माहित नाही काय झाले, त्या प्रमाणे पंचासाठी असायला हवे की, मला कळाले नाही. “सॉफ्ट सिग्नलला कोहलीने अम्पायर्स कॉल च्या प्रमाणे सांगितले आणि म्हणाला, “काही निर्णय असे असतात ज्यामुळे सामन्याचे चित्र पालटते.
खासकरून अशा सामन्यात. आज आम्ही हे अनुभवले. उद्या कोणत्या दुसर्या संघाविरुद्ध असे होऊ शकते. तुम्ही या सर्वांना दुर्लक्षित करून सामन्याला साधारण आणि स्पष्ट ठेवण्याचा प्रयत्न करता. जास्त दबाव असणार्या सामन्यात ही स्थिती आदर्श नसते. आम्हाला अजून जास्त स्पष्ट गोष्टी हव्या आहेत.”