लंडन :- अपयशाच्या गर्तेतून जात असलेल्या विराट कोहलीला पाकिस्तानचा प्रमुख फलंदाज बाबर आझमने पाठींबा दिला होता. कोहलीने यासाठी बाबरचे आभार मानले असून शाहिद आफ्रिदीच्या वक्तव्याला खोटे ठरवले आहे.
कोहलीच्या कारकीर्दीतील हा अपयशी कालखंडही लवकर संपेल, अशा शब्दात बाबरने कोहलीला पाठींबा दर्शवला होता, त्यावर कोहली तूला प्रतिसादही देणार नाही, असे आफ्रिदी म्हणाला होता. मात्र, कोहलीने बाबरला धन्यवाद देत आफ्रिदीलाही खोटे ठरवले.
This too shall pass. Stay strong. #ViratKohli pic.twitter.com/ozr7BFFgXt
— Babar Azam (@babarazam258) July 14, 2022
बाबरची सध्याची कामगिरी पाहून अशीच कामगिरी यापुढेही करत राहा, तूझी फलंदाजी पाहून खूप आनंद मिळतो, असेही कोहलीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या जवळपास तीन वर्षांत कोहलीच्या बॅटमधून मोठी खेळी किंवा शतकी खेळी घडलेली नाही. 2019 साली बांगलादेशविरुद्धच्या शतकी खेळीत त्याने आपले 70 वे आंतरराष्ट्रीय शतक साकार केले होते, त्यानंतर मात्र, त्याला अद्याप शतक फटकावता आलेले नाही. तसेच त्यानंतर अनेक सामन्यामध्ये तो सातत्याने अपयशी ठरत आहे. त्यामुळे त्याला सातत्याने येत असलेल्या अपयशावर विक्रमादीत्य सुनील गावसकर, कपिल देव यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी भाष्य केले आहे.