कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण ३० जागांसाठी मतदान होणार असून यामध्ये नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. निवडणुकांच्या तोंडावर तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकत भाजपच्या गोटात सामील झालेले सुवेंदू अधिकारी हे सध्या नंदिग्राम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतायेत. मात्र यंदा नंदीग्राम येथे त्यांना थेट तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आव्हान दिलंय.
West Bengal: Vehicle of media personnel attacked near booth number 170 in Kamalpur, Nandigram.
“These are work of Pakistanis, ‘Jay Bangla’ is a slogan from Bangladesh. There are voters from a particular community at that booth who are doing this,” says BJP’s Suvendu Adhikari pic.twitter.com/gMsENDDnA5
— ANI (@ANI) April 1, 2021
यातच मतदानादरम्यान, सुवेंदू अधिकारी यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याचं सांगण्यात येत आहे. आजच्या हल्ल्यात सुवेंदू अधिकारी यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहेच, पण त्यांच्या ताफ्यातील इतर गाड्यांचंही नुकसान झालं आहे. पश्चिम बंगालमध्ये जंगलराज सुरु असल्याचा आरोप सुवेंदू अधिकारींनी केला. इतकंच नाही तर तृणमूल काँग्रेस इथे बांग्लादेशच्या घोषणा देऊन एका समुहाच्या बळावर विजय मिळवू इच्छित आहे, असंही अधिकारी म्हणाले.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये ‘नंदीग्राम’ला विशेष महत्व आहे. २०००च्या दशकात ममता बॅनर्जी यांनी येथेच शेतकऱ्यांच्या हक्कांची पायमल्ली होत असल्याचा दावा करत आंदोलन छेडलं होत. आंदोलनाचा चेहरा बनलेल्या ममतांनी पुढे राज्यातील डाव्यांची सत्ता उलथवून टाकत सत्तेच्या चाव्या काबीज केल्या होत्या.
राजकीयदृष्टया महत्वाच्या असलेल्या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाचे महत्व यंदा अधिकच वाढलं आहे. येथे तृणमूलचे महत्वाचे नेते मानले जाणारे सुवेंदू अधिकारी यंदा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर दुसरीकडे पक्षाला लागलेली गळती व राज्यात भाजपने लावलेली संपूर्ण ताकद या परिस्थितीत ममता बॅनर्जी लढा देत आहेत. नंदिग्रामचे महत्व जाणूनच भाजपच्या गोटामध्ये सामील झालेल्या सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय ममता बॅनर्जींनी घेतलाय.