अहमदाबाद – महाराष्ट्राच्या ऋतूराज गायकवाडने यंदाच्या मौसमात सातत्याने शतकी खेळी साकरली. त्याने शुक्रवारी सौराष्ट्रविरुद्धच्या विजय हजारे करंडक ( Vijay Hazare Trophy ) क्रिकेट स्पर्धेतही शतक फटकावले. मात्र, तरीही महाराष्ट्राला सौराष्ट्रकडून 5 गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. सौराष्ट्रच्या शेल्डन जॅक्सनने दमदार शतकी खेळी करत संघाला विजेतेपद मिळवून दिले.
“धोनीनंतर चेन्नई संघाच्या कर्णधार पदासाठी मराठमोळा ऋतुराज योग्य”
यंदाच्या स्पर्धेत सातत्याने त्रिशतकी धावा करणाऱ्या महाराष्ट्राचा डाव या अंतिम सामन्यात मात्र, 50 षटकांत 9 बाद 248 असा रोखला गेला. सौराष्ट्रकडून चिराग जानीने 3 गडी बाद केले. विजयासाठी आवश्यक धावांचे आव्हान सौराष्ट्रने 46.3 षटकात 5 बाद 249 धावा करत पूर्ण केले. त्यांच्याकडून शेल्डन जॅक्सन याने नाबाद 133 धावांची खेळी केली. यात त्याने 136 चेंडूत 12 चौकार व 5 षटकार अशी आतषबाजी केली. त्याला सुरेख साथ देताना हार्विक देसाईने 50 धावांची खेळी केली.
“धोनीनंतर चेन्नई संघाच्या कर्णधार पदासाठी मराठमोळा ऋतुराज योग्य”
विजयावर शिक्कामोर्तब करताना चिराग जानीने नाबाद 30 धावांची आक्रमक खेळी केली. यंदाच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऋतूराज गायकवाडने 10 सामन्यात आठ शतके फटकावली. त्यात एका द्विशतकी खेळीचाही समावेश होता. संभाव्य विजेता मानल्या जात असलेल्या महाराष्ट्राला या सामन्यात मात्र, मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सौराष्ट्रचा शेल्डन जॅक्सन अंतिम सामन्याचा तर महाराष्ट्राचा ऋतूराज गायकवाड स्पर्धेचा मानकरी ठरला.
Winners Are Grinners! 🏆 ☺️@JUnadkat – captain of Saurashtra – receives the #VijayHazareTrophy from the hands of Mr. @JayShah, Honorary Secretary, BCCI. 👏 👏
Scorecard 👉 https://t.co/CGhKsFzC4g #Final | #SAUvMAH | @mastercardindia | @saucricket pic.twitter.com/fBrgckoghb
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 2, 2022