Rituraj Gaikwad – भारतात नुकतीच विजय हजारे करंडक स्पर्धा खेळवली गेली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील पुण्याचा मराठमोळा ऋतुराज गायकवाड प्रचंड चर्चेत राहिला. ऋतुराजच्या संपूर्ण स्पर्धेतील अफलातून खेळासाठी त्याची सर्वच स्तरातून जोरदार प्रशंसा केली जात आहे. दरम्यान त्याने उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात एका षटकात मारलेल्या ७ षटकारांची जोरदार चर्चा झाली. त्याचबरोबर फलंदाजी करताना त्याच्या शांत स्वभावाची तुलना आता एमएस धोनीशी केली जात आहे.
पठ्ठ्याचा नादच खुला! एका ओव्हरमध्ये घेतल्या ६ विकेट, व्हिडिओ तुफान व्हायरल
ऋतुराज गायकवाडने ( Rituraj Gaikwad ) आयपीलमध्ये २०२१ आणि २०२२ या दोन हंगामात चेन्नई संघासाठी भरपूर धावा केल्या आहेत. २०२१ च्या आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करत त्याने ऑरेंज कॅपही जिंकली होती. दरम्यान, माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि सध्याचे चेन्नई सुपर किंग्जचे कोच मायकल हसीने ऋतुराज गायकवाड आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी या दोघांच्यात एका गोष्ट समान असल्याचे म्हटले आहे.
पठ्ठ्याचा नादच खुला! एका ओव्हरमध्ये घेतल्या ६ विकेट, व्हिडिओ तुफान व्हायरल
मायकल हसीने म्हटले की,”ऋतुराजचा ( Rituraj Gaikwad ) खेळादरम्यान स्वभाव नेहमी शांतच असतो. त्यामुळे तो भविष्यात संघाचे नेतृत्वदेखील करण्यास योग्य आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाच्या भविष्यातील योजना काय आहेत? याबाबत मला जास्त माहिती नाही, मात्र ऋतुराज हा धोनीप्रमाणे शांत स्वभावाचा आहे. त्याचप्रमाणे तो अडचणीत असतानाही आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करत राहतो. तो खेळाचा चांगल्याप्रकारे अभ्यासही करतो”, असे हसीने म्हटले आहे.
“ऋतुराज ( Rituraj Gaikwad ) हा अत्यंत शांत स्वभावाचा आणि शिस्तप्रिय खेळाडू असून तो धोनीप्रमाणे वागण्याच्या नरहमीच प्रयत्न करतो. त्याचबरोबर ऋतुराजमध्ये इतर खेळाडूंच्या तुलनेत नवीन गोष्टी शिकण्याची जास्त इच्छा असल्याचे पाहायला मिळते, अशा शब्दांत मायकल हसीने ऋतुराजचे कौतुक केले आहे.
“He (Gaikwad) obviously watches Dhoni very closely. And the other impressive thing about him is he picks up things that other players don’t pick up that quickly,” @mhussey393 said.https://t.co/LiQqnuid4H
— Circle of Cricket (@circleofcricket) December 2, 2022
विजय हजारे ट्रॉफी २०२२ मध्ये प्रदर्शन
ऋतुराज गायकवाडने ( Rituraj Gaikwad ) यंदाच्या विजय हजारे करंडक स्पर्धेत १० सामन्यांत १२६३ धावा फटकावल्या आहेत. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे आता २०२३ला भारतातच होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी त्याच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. ऋतुराजने संपूर्ण स्पर्धेत ८ शतके ठोकली असून यामध्ये एका द्विशतकाचाही समावेश आहे. त्याने यंदाच्या वर्षभरात राष्ट्रीय क्रिकेट खेळताना अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. मात्र आता त्याला भारताच्या प्रमुख संघात स्थान मिळवण्यास आणखी किती चांगली कामगिरी करावी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.