मुंबई : राज्यात सध्या रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. त्यातच शिंद-भाजपच्या सरकारमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसची साथ लाभली आहे. दरम्यान, २०१९ साली विधानसभेत आणि प्रचारावेळी देवेंद्र फडणवीसांनी ‘मी पुन्हा येईन’चा नारा दिला होता. त्यावरून देवेंद्र फडणवीसांवर प्रचंड टीकाही झाली होती. पण, २०१९ साली महाविकास आघाडीचं सरकार आल्याने देवेंद्र फडणवीसांचे स्वप्न भंगले होते. मात्र, मागच्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. देवेंद्र फडणवीस पुन्हा आले ते उपमुख्यमंत्री म्हणून… अशातच आता ‘पुन्हा येईन’च्या नाऱ्यावरून फडणवीसांनी मिश्किल टिपण्णी केली आहे.
🕤 9.43pm | 08-07-2023📍 Nagpur | रा. ९.४३ वा | ०८-०७-२०२३ 📍नागपूर
LIVE | पुस्तक प्रकाशन व ध्वनिफीत प्रकाशन सोहळा https://t.co/5nx29eo5Zf— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 8, 2023
नागपूरमध्ये पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी,“‘मी पुन्हा येईन’ कविता म्हटल्यावर वाटलं नव्हतं, इतकी अडचण होईल”, अशी मिश्कील टिप्पणी केली आहे. तसेच “मी देखील विधानसभेत ‘मी पुन्हा येईन’ ही कविता केली होती. तेव्हा वाटलं नव्हतं, इतकी अडचण होईल. लोकांनी कविता डोक्यावर घेतली होती. आठ दिवसांत दहा भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला. त्यानंतर राज्य सरकार आलं नाही. कवितेमुळे राज्य सरकार गेलं, असं सांगितलं गेलं.”
पुढे बोलताना,“शेवटी मला हे सांगावं लागलं की, मी जे ‘पुन्हा येईन’ म्हणाला होतो. ते मी पन आलो आणि इतरांनाही बरोबर घेऊन आलो. परवा अजून एकाला बरोबर घेतलं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या परिस्थितीत कविता प्रत्यय देत असते,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.