सातारा – लोकसभा मतदार संघातील मतदारांच्या बोटांवरची शाई अजून पुसली नाही, तोपर्यंतच काही लोकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी अवघ्या तीन महिन्यात निवडणुका लावल्या आहेत. त्यामुळे जनतेच्या मनात प्रचंड रोष तयार झाल्याने ही निवडणुक आता जनतेनेच हातात घेतली आहे, असे वक्तव्य श्रीनिवास पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, श्रीनिवास पाटील म्हणाले की ‘आम्ही प्रचाराची रणनिती ठरवण्याची गरज नाही, जनताच आता प्रचारनिती ठरवेल’. सातारा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून अखेर श्रीनिवास पाटील यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपकडून उदयनराजेंविरोधत श्रीनिवास पाटील ही लढत रंगणार आहे.