पोर्ट एलिझाबेथ – आयसीसी महिलांच्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सोमवारी भारतीय संघासाठी संततधार पाऊस धावून आला व डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे भारतीय संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला. या सामन्यात संततधार पावसामुळे आयर्लंडचा डाव पूर्ण होऊ शकला नाही व नियमाच्या जोरावर भारतीय संघाला 5 धावांनी विजयी घोषित करण्यात आले. 8.2 षटकांचा खेळ झाल्यावर आयर्लंडच्या 59 धावा असणे गरजेचे होते मात्र, ते 5 धावांनी पिछाडीवर असल्याने त्यांचा पराभव झाला. यावेळी त्यांना विजयासाठी 70 चेंडूत 102 धावांची गरज होती.
Vice-captain @mandhana_smriti starred with the bat & bagged the Player of the Match as #TeamIndia beat Ireland by 5️⃣ runs (via DLS) to seal a place in the #T20WorldCup semis! 👏 👏 #INDvIRE
Scorecard ▶️ https://t.co/rmyQRfmmLk pic.twitter.com/GftbVg1W4W
— BCCI Women (@BCCIWomen) February 20, 2023
भारताने विजयासाठी दिलेल्या 156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात आयर्लंडच्या दोन फलंदाज बाद झाल्या. पहिल्याच चेंडूवर ऍमी हंटर धावबाद झाली तर पाचव्या चेंडूवर रेणुका सिंगने ओर्ला प्रेंडरगास्टचा त्रिफळा उडवला. त्यानंतर मात्र, गॅबी लेविसने नाबाद 32 तर, कर्णधार लॉरा डेल्नीने नाबाद 17 धावा करत डाव सावरताना संघाचे अर्धशतक फलकावर लावले. त्यावेळी त्यांची स्थिती 2 बाद 54 होती व संततधार पावसाला सुरूवात झाली.
पंचांनी वारंवार पाहणी केल्यावर हा सामना होणार नसल्याचे जाहीर करत भारतीय संघाला डकवर्थ-लुइस नियमाच्या आधारे विजयी घोषित केले. या नियमांतर्गत 8.2 षटकांचा खेळ झालेला असताना आयर्लंडला विजयासाठी 59 धावा असणे महत्वाचे होते. मात्र ते पाच धावांनी पिछाडीवर होते. त्यामुळे भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठली.
तत्पूर्वी, भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर स्टार फलंदाज स्मृती मानधनाने थाटात सुरुवात केली. तीने शफाली वर्मासह संघाला अर्धशतकी सलामी दिली. शफाली 29 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 24 धावा करत बाद झाली. यावेळी कर्णधार हरमनने स्मृतीला साथ देत संघाचे शतक फलकावर लावले. मात्र, स्थिरावल्यावरही हरमन अनावश्यक फटका मारून 13 धावांवर परतली.
Asia Cup 2023 : आशिया करंडकमध्ये #INDvPAK सामना होणे अत्यंत गरजेचे अन्यथा ‘एसीसी’चा…
दरम्यान स्मृतीने आपले अर्धशतक पूर्ण केले व शतकाकडे कूच केली. भरात असलेल्या रिचा घोषने साफ निराशा केली. जेमिमा रॉड्रीक्सही 12 चेंडूत 3 चौकारांसह अवघ्या 19 धावा काढून बाद झाली. दीप्ती शर्मानेही निराशा केली. तीला खातेही उघडता आले नाही. मानधनाही समोरून प्रमुख फलंदाज बाद झाल्याने दडपणाखाली आली व वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात 87 धावांवर बाद झाली. मात्र, त्यापूर्वी तीने पुजा वस्त्रकारला साथिला घेत संघाचे दीडशतक फलकावर लावले. मानधनाने आपल्या खेळीत 56 चेंडूंचा सामना करताना 9 चौकार व 3 षटकार फटकावले. भारताचा डाव 2- षटकांत 6 बाद 155 असा रोखला गेला. आयर्लंडकडून लॉरा डेल्नीने 3 तर, ओर्ला प्रेंडरगास्टने 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक –
भारत महिला संघ – 20 षटकांत 6 बाद 155 धावा. (स्मृती मानधना 87, शफाली वर्मा 24, जेमिमा रॉड्रीक्स 19, हरमनप्रीत कौर 13, लॉरा डेल्नी 3-33, ओर्ला प्रेंडरगास्ट 2-22).
आयर्लंड महिला संघ – 8.2 षटकांत 2 बाद 54 धावा. (गॅबी लेविस नाबाद 32, लॉरा डेल्नीने नाबाद 17, रेणुका सिंग 1-10).