दुबई – आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनातील संकटे काही केल्या कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याने आशिया क्रिकेट समितीपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. या स्पर्धेतील भारताचे सामने अन्यत्र देशात हलवण्यात येणार असून पाकिस्तानच्याच आयोजनात ही स्पर्धा व त्यातील अन्य सामने पाकिस्तानमध्येच होणार आहेत. मात्र, आशिया क्रिकेट समितीच्या माध्यम करारत भारत व पाकिस्तान यांच्यात सामना होणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा हा करारच धोक्यात येणार आहे.
या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असले तरीही भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यास जाणार नाही, असे बीसीसीआयने सांगितले होते. त्यानंतर त्याचे कवित्व अद्यापही सुरू आहे. यातून तोडगा काढण्यासाठी या स्पर्धेतील भारताचे सर्व सामने अमिरातीत हलवण्यावर एकमत झाले. मात्र, तरीही या स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचा ठरेल असा भारत व पाकिस्तान यांच्यात सामना होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
समितीने प्रसारण हक्कांचा करार समितीशी झालेला असून त्यावर संकटाचे मळभ निर्माण झाले आहे. या दोन संघात सामना झाला नाही तर हा करारच रद्द होण्याचा धोका आहे. भारत व पाकिस्तान यांच्यात असलेल्या राजकीय तणावामुळे बीसीसीआय या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार नसल्याचे सांगितले.
दुसरीकडे भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी आला नाही तर पाकिस्तानचा संघही भारतात विश्वकरंडक स्पर्धेत सहभागी होणार नाही असेही बोलले गेले. यावर तोडगा काढण्यासाठी भारताचे सामने अमिरातीत खेळवण्यावर जरी एकमत झालेले असले तरीही अद्याप पाकिस्तान क्रिकेट मंडळाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अशा स्थितीत जर भारत व पाकिस्तान यांच्यात सामना होणे आशिया समितीसाठी अत्यंत महत्त्वाचे बनले आहे.
Jasprit Bumrah : आयपीएलद्वारे बुमराह करणार पुनरागमन; पण BCCI ने …
या करारानुसार भारत व पाकिस्तान यांच्यात किमान दोन सामने होणे गरजेचे आहे तरच प्रसारण हक्क असलेल्या कंपनीला मोठा नफा होणार आहे. मात्र, जर हे सामने झाले नाहीत तर कंपनीचे होणारे नुकसान कोण भरून देणार हा देखील प्रश्न आहे.