जाधववाडी -आमचा लाडका, बाबू छान गाडी चालवतो , अहो किती एक्स्पर्ट आहे तो, कोणतीही गाडी द्या तो चालवतो, असे उद्गार सध्याचे निष्काळजी पालक अभिमानाने काढताना दिसतात. पूर्वी कॉलेज तरुण -तरुणी वयाची अठरा वर्षं पूर्ण झाल्यावर रितसर परवाना काढून वाहन घेऊन येत असत. सध्या अल्पवयीन मुलाच्या हातात वाहने दिली जात असून ते बेफाम चालवित आहेत. हे सबंधित पाल्यासाठी व पालकांसाठीदेखील डोकेदुखी ठरु शकते.
काय आहेत, अल्पवयीन मुलांनी गाडी चालवल्यास नियम?
देशातील रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी केंद्र सरकारने वाहतूक नियम भंगाच्या दंडाच्या रकमेत वाढ केलेली आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुला-मुलींकडून वाहन चालविताना गुन्हा घडल्यास वाहन मालक-पालकांना 25 हजार रुपयांचा दंड व तीन वर्षे तुरुंगवास होणार आहे.
देशातील रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी केंद्र सरकारने वाहतूक नियम भंगाच्या दंडाच्या रकमेत वाढ केलेली आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुला-मुलींकडून वाहन चालविताना गुन्हा घडल्यास वाहन मालक-पालकांना 25 हजार रुपयांचा दंड व तीन वर्षे तुरुंगवास होणार आहे. तसेच रुग्णवाहिकांना मार्ग न दिल्यास वाहन चालकांवर 10 हजार रुपये दंड होणार आहे. या बदलाच अंमलबजावणी लागू करण्यात आला आहे. याबाबत परिवहन विभागाने राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) आदेश दिले आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांचा भंग केल्यास वाहनधारकांना पूर्वीपेक्षा कमीत-कमी पाच पट अधिक दंड भरावा लागणार आहे. असे नियम असताना देखील सर्वत्रच नियमाची पायमल्ली होत असल्याचे दिसत आहे.
पोलिसांसमोरही अल्पवयीन वाहने दामटत असून पोलिसांचा धाक उरला नाही पोलीस केवळ आपल्या मोबाईल मध्ये नियम तोडणाऱ्यांचे फोटो घेत असतानाचे चित्र अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे ,पूर्वी पोलीस त्यांना हटकत असत त्यामुळं थोडा दबदबा होता परंतु आता कोणीही हटकत नसल्याने कोणाला धाक उरला नाही ,पोलसांनी काढलेल्या फोटोतील वाहनचालकांना किती जणांना वाहनविभागाची नोटीस येते कोणासठाऊक कदाचित वाहनाचा वेग व फोटो कितपत स्पष्ट ह्यावरून कारवाईची आकडेवारी
स्पष्ट होईल.
पालकांची जबाबदारी नव्हे हे तर कर्तव्यच
पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे वाहनाचे नुकसान झाल्यास इन्शुरन्स आहे किंवा नवीन वाहन घेता येईल,परंतु एखादा का बहुमूल्य जीव गेला तर त्याची पुन्हा भरपाई होणे शक्य नाही ,ह्याकरिता प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे .अनेक अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्याचा अनुभव प्रत्यक्षात कमी असल्याने हे वाहनचालक विना अनुभव रस्त्यावर वावरत असतात परिणामी इतर वाहनचालकांना धोका निर्माण करीत असतात अनुभव असल्याने स्वतःच्या चुकीमुळे एखाद्या निरपराधांचा निष्कारण जीव जाईल अशी अपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येकाने आपल्या मुलांना वाहन देण्यापासून रोखावे, हि आपल्या प्रत्येक सुज्ञ पालकांची जबाबदारी आहे.
================