नवी दिल्ली – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत प्रोजेक्ट वीर गाथा 3.0 च्या ‘अव्वल -100’ विजेत्यांचा सत्कार केला. “ वीर गाथा हा प्रकल्प देशाच्या शूरवीरांची युवकांना ओळख करून देण्याचा आणि त्यांच्या शौर्याच्या गाथा युवकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न होता. ‘राष्ट्र प्रथम ’ ची मूल्ये मजबूत करण्यासाठी संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाच्या एकत्रित प्रयत्नातून हा प्रकल्प सुरू करण्यात आला., असे राजनाथ सिंह म्हणाले.
याप्रसंगी एका संस्मरणीय क्षणी संरक्षण मंत्री म्हणून आपल्या कार्यकाळात प्रथमच राजनाथ सिंह यांनी यातील एक विजेती आणि कटक, ओडिशामधील डीएव्ही पब्लिक स्कूलच्या इयत्ता 11 वी मधील विद्यार्थिनी बर्नाली साहू हिला उपस्थितांना संबोधित करण्यासाठी मंचावर बोलावले ,देशाच्या भविष्याला आकार देण्यात तरुणाई ही सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. ते विकसित राष्ट्राची जबाबदारी पार पाडतील,” असे साहू बर्नाली म्हणाली.
या कार्यक्रमात परमवीर चक्र पुरस्कारप्राप्त सुभेदार मेजर (मानद कॅप्टन) योगेंद्र सिंग यादव (निवृत्त) यांनी कारगिल युद्धातील त्यांची वास्तविक जीवन कथा सांगितली. या युद्धात त्यांनी सर्व अडचणींवर मात करत भारताच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. सर्वोत्कृष्ट बलिदान देऊन आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी मुलांना केले.