बुलंदशहर (उत्तर प्रदेश) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे 19,100 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. हे प्रकल्प रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू आणि शहरी विकास आणि गृहनिर्माण यां सारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित आहेत.
सर्वाधिक लोकसंख्या असलेले उत्तर प्रदेश हे दुर्लक्षित राज्य होते. पंतप्रधानांनी ‘शासक ’ मानसिकतेवर टीका केली आणि पूर्वीच्या काळी सत्तेसाठी सामाजिक विभाजन केल्यामुळे राज्य आणि देशाला मोठी किंमत मोजावी लागली. “देशाचे सर्वात मोठे राज्य जर कमकुवत असेल तर राष्ट्र कसे बलवान झाले असते?” असा प्रश्न पंतप्रधानांनी केला.
आधुनिक द्रुतगती मार्गांद्वारे उत्तर प्रदेशच्या सर्व भागांशी संपर्क व्यवस्था वाढवणे, पहिल्या नमो भारत ट्रेन प्रकल्पाची सुरुवात, अनेक शहरांमध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी आणि राज्याला पूर्व आणि पश्चिम समर्पित फ्रेट कॉरिडॉरचे केंद्र बनवण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.“या विकास प्रकल्पांचा प्रभाव पुढील अनेक शतकांपर्यंत राहील ” यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, जेवार विमानतळ पूर्ण झाल्यावर या प्रदेशाला एक नवीन ताकद आणि गती मिळेल, असे पंतप्रधान म्हणाले.
पश्चिम उत्तर प्रदेश देशातील प्रमुख रोजगार प्रदात्या प्रदेशांपैकी एक बनला आहे”. सरकार 4 जागतिक दर्जाच्या औद्योगिक स्मार्ट शहरांवर काम करत आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. यापैकी एक शहर पश्चिम उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये आहे, पंतप्रधानांनी आज या महत्त्वाच्या स्मार्ट शहराचे उद्घाटन केले. याचा फायदा या भागातील उद्योग, लघु आणि कुटीर व्यवसायांना होणार आहे. या शहरामुळे कृषी आधारित उद्योगांसाठी नवीन संधी निर्माण होतील आणि स्थानिक शेतकरी आणि कामगारांना मोठा लाभ होईल असे मोदी म्हणाले.