Vasant More । मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. मराठी माणसाच्या हक्काचा विषय असो वा एखाद्याला मदत करणं असो मोरे आपली प्रत्येक अपडेट सोशल मीडियावरून देत असतात. सोशल मीडियावर देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग असून, त्यांची प्रत्येक पोस्ट नेहमीच ते चर्चेत असते. अशात त्यांची सोशल मीडियावर पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
लवकरच लोकसभा निवडणूक होणार आहे. अशात पुणे शहरातून लोकसभा निवडणूक लढवून खासदार होण्याची इच्छा त्यांनी आधीच व्यक्त केली आहे. आणि त्यांचे गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे शहरात ‘भावी खासदार’ म्हणून बॅनर चर्चेत आले होते. अशात पुणे लोकसभा मतदार संघातून मनसे नेते साईनाथ बाबर आणि वसंत मोरे इच्छूक आहे.
काही दिवसांपूर्वी या दोघांपैकी कोणाला उमेदवारी देणार त्याचे स्पष्ट संकेत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिले होते. त्यानंतर वसंत मोरे यांनीही आपली तयारी सुरु ठेवली. आता मनसे नेते वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्टवरुन जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या पोस्टमुळे वेगवेगळे अर्थ काढले जात असून मनसेमधील गटबाजी समोर आल्याचे बोलले जात आहे.
Vasant More । नेमकी काय आहे वसंत मोरे यांची पोस्ट
‘एका मर्यादेच्या बाहेर त्रास केल्यानंतर माणूस शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा करतो.’ दरम्यान, वसंत मोरे यांनी दोन वाक्यांची पोस्ट लिहिली आहे. परंतु ही पोस्ट सोशल मीडियावरच नाही तर पुण्यातील राजकारणात खळबळ उडवणारी ठरली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात मोरे यांनी लिहिलेली भावनिक पोस्टचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे. पुण्यात मनसेमध्ये अंतर्गत गटबाजी? समोर आल्याची चर्चा या पोस्टमुळे सुरु झाली आहे. आगामी लोकसभा लढविण्यासाठी मोरे यांना तिकीट देणार का ? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
Vasant More । वसंत मोरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट चर्चेत
तर नुकतीच वसंत मोरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. कात्रजच्या डेअरी संदर्भातल्या विषयासाठी ही भेट घेतल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले. परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हे वाचलं का ?
Mother Name । कामाची बातमी…आता शासकीय कागदपत्रांवर आईचंही नाव बंधनकारक; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा ‘निर्णय’
अखेर ठरलं तर…! जालन्यातून मंत्री रावसाहेब दानवे तर नागपुर अन् बीडमधून ‘या’ नेत्यांची उमेदवारी फिक्स ?