मुंबई – मुंबईमध्ये आज महाराष्ट्र विकास आघाडीची वज्रमुठ सभा सुरु आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आव्हाड म्हणाले की, मुंबई ही कामगारांच्या घामाने सजली आहे. इथल्या कष्टकरी मराठी माणसाने मुंबईची शोभा वाढवली. मागील 10 वर्षात मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईवर राग असलेली लोक दिल्लीत बसली आहेत.
दरम्यान यावेळी आदित्य ठाकरे यांनीही सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रातून अनेक उद्योग बाहेर गेले, गद्दारदेखील गुजरातला गेले. मुंबईला तोडण्याचे काम सुरू आहे. हे गद्दार सरकार आहे. हे सरकार कंत्राटदार आणि बिल्डरांचं सरकार आहे. सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे यांना वाईट बोलणारे मंत्री अजूनही मंत्रिमंडळात आहेत हे दुर्दैव असल्याचंही ते म्हणाले.