वाल्हे – पिंगोरी गावची कृषी विभागाच्या वतीने यावर्षी शेती शाळेसाठी निवड केली असून पहिली शेती कार्यशाळेत शेतकऱ्यांना अंजीर लागवडीबाबत माहिती देण्यात आली. सीताफळांवर येणाऱ्या रोगांबाबत माहिती देण्यात आली. यावेळी शेतीविषयक माहिती मिळावी म्हणून तरुणांच्या मागणीनुसार शेतकऱ्यांचा एक व्हॉटस्ऍप ग्रुप स्थापन करण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पिकांची तंत्रज्ञानाची व बी बियाण्यांची यांची माहिती देण्यात येणार आहे.
कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान यंत्रणा अर्थात आत्मा यांच्या वतीने तालुका कृषी अधिकारी अंकुश बरडे व मंडळ कृषी अधिकारी अनिल धुरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. वर्षभरामध्ये सहा शेती शाळा घेण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना अंजीर लागवड व व्यवस्थापनावर वेगवेगळ्या कृषी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन, प्रात्यक्षिक व प्रशिक्षण दिले जाणार आहे.
पिंगोरी परिसरामध्ये अंजीर पिकासाठी वातावरण पोषक असल्याने अंजीर लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. कृषी तंत्रज्ञानचे गणेश जाधव यांनी शेतकऱ्यांना उत्पादनवाढीचा कानमंत्र देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी पिंगोरीचे पोलीस पाटील राहुल शिंदे, माजी सरपंच पल्लवी भोसले, प्रगतशील शेतकरी विष्णू चौधरी, कल्याण धुमाळ, ज्ञानेश्वर शिंदे, भगवान शिंदे, महादेव शिंदे, कृषी सेवक अंजली शिंदे, कृषी पर्यवेक्षक चेतन भागवत, सरस्वती बिराजदार, मुक्ता सोळंखी, मनोज झांजरे, शेतकरी उपस्थित होते.