मुंबई – सोशल मीडियावर सर्वात ऍक्टिव्ह असणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. उर्फी नेहमीच सोशल मीडियावर काहींना काही करामत करून चर्चेत असते. फॅशन स्टाईलप्रमाणेच उर्फी आपल्या वक्तव्यांमुळे प्रसिद्धी झोतात असते. उर्फी स्वतःचे कपडे स्वतः डिझाईन करते हे अनेकांनी माहिती आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की उर्फी ही कवी देखील आहे.
होय हे खरं आहे. उर्फीला कविता देखील करायला आवडतात. नुकतंच उर्फीने आपल्या इंस्टाग्रामवर आपल्या चारोळ्या पोस्ट केल्याचे पाहायला मिळाले. उर्फीने लिहिले,” बहुत मजलूम है दुनिया मै,बहुत गम है दुनिया मै,एक हम भी और सही… मरणे के बाद जन्नत मिले तो सही वरणा दोजख तो हमने यही देख ली है, एक दोजख ओर सही । अशा आशयाची पोस्ट उर्फीने केली आहे.
उर्फीच्या या चारोळ्यांनी सोशल मीडियावर चर्च्यांना उधाण आले आहे. अनेकांनी तिला तुझं ब्रेकअप झालं का ? असा सवाल विचारला आहे. उर्फीच्या या पोस्टवर कॅमेन्टचा पाऊस पडला आहे. उर्फीची ही दर्दी कविता चाहत्यांच्या मनाला चांगलीच टच करून गेल्याचे दिसते.