संगमनेर -तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या अचानक वाढल्याने प्रशासनाने कठोर पाऊले उचलली असली, तरी या सगळ्या परिस्थितीला प्रशासनच जबाबदार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये झडत आहेत. त्यामुळे ग्रीन झोनचे स्वप्न पाहणाऱ्या संगमनेरची वाटचाल आता रेड झोनकडे चालली आहे का ? असा प्रश्न संगमनेरकरांना पडला आहे. परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे संपूर्ण तालुक्याचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे.
करोनाची बाधा होवून मृत्यू झालेल्या धांदरफळ येथील व्यक्तीला मधुमेहाचा त्रास होता. त्यामुळे उपचारासाठी ही व्यक्ती नेहमी शहरातील एका खासगी रुग्णालयात तपासणी व उपचारासाठी येत. नेहमीप्रमाणे 5 मे रोजीही ही व्यक्ती त्या खासगी रुग्णालयात आली होती. त्यावेळी डॉक्टरांना शंका आल्याने त्यांनी या रुग्णाचा एक्सरे व सीटी स्कॅन केला. त्यावरुन त्यांचा संशय अधिक बळावल्याने त्यांनी त्या रुग्णास ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात जाण्याची विनंती करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयात गोंधळ घातल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तेथेच त्याच्या स्त्रावाचे नमुने घेतले. त्यानुसार स्त्राव नगर ऐवजी मुंबईला पाठविले.
घरी गेल्यानंतर 7 मे रोजी सकाळी 7 वाजता ही व्यक्ती मृत पावली. सदर रुग्णाच्या निधनानंतर त्याच्या नातेवाईकांनी हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे गावात सांगितले. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांसह धांदरफळ येथील अनेक प्रतिष्ठीतांनी मृताच्या घरी जावून त्यांचे अंत्यदर्शन घेतले. समाजातील ज्येष्ठ व्यक्तीचे निधन झाल्याची वार्ता संपूर्ण तालुक्यात पसरल्याने ठिकठिकाणच्या त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या घरी धाव घेतली.
दुपारी 2 वाजता मुंबईच्या प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात ही व्यक्ती करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाची झोप उडाली आणि अनेक व्यक्ती मृताचे अंत्यदर्शन घेवून गेल्यानंतर प्रशासनाने मृतदेहाच्या जवळपास जाण्यास मनाई केली. या रुग्णाची लक्षणे संशयात्मक वाटत असतानाही ग्रामीण रुग्णालयाने त्यांना दाखल करुन घेण्याऐवजी रुग्णाच्या इच्छेनुसार त्यांना घरी जावू दिले, हा सर्वांत मोठा हलगर्जीपणा झाल्याचे या प्रकरणातून आता पुढे आले आहे.
त्यानंतरही तब्बल साडेपाच तास रुग्णाचा मृतदेह इसम जेसीबीने खड्डा घेत असल्याचे आपणास दिसले. मात्र त्याकडे आपण दुर्लक्ष केले. आपण दुसऱ्या दिवशी पुन्हा शेतात गेल्यावर खड्ड्याबाबत आपणास संशय आला. त्यामुळे तहसीलदार व पोलीस ठाण्यास याबाबत माहिती दिली. अभंग यांच्या तक्रारीनंतर पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. तसेच हा खड्डा उकरला असता, त्यात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला.
हा मृतदेह सुभाष रामभाऊ निर्मळ (वय 50, रा. निर्मळ पिंप्री, ता. श्रीरामपूर) यांचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर कुकाणा येथील वैद्यकीय अधिकारी रामेश्वर शिंदे यांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. हा घातपात आहे की नैसर्गिक मृत्यू, याचा उलगडा न झाल्याने पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे. पुढील तपास कुकाणा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक भीमराव पवार करत आहेत. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बाधित व्यक्तीचा अंत्यविधी प्रशासनाच्या उपस्थितीत झाला आहे. त्याठिकाणी जास्त लोक उपस्थित नव्हते. सामाजिक माध्यमांवर जो आकडा येत आहे, तो चुकीचा असून, अंत्यविधीच्या अगोदर म्हणजे अहवाल येईपर्यंत काही लोकं भेट देऊन गेले. त्यांची यादी आम्ही मिळवली आहे. त्यांना क्वारंटाईन केले आहे. तसेच दैनंदिन तपासणीही घेण्यात येत आहे. काही लक्षणे आढळल्यास त्यांचे नमुने घेऊन पाठविण्यात येतील. नागरिकांनी घरातच बसावे, काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे.
अमोल निकम, तहसीलदार, संगमनेर.