Sharad Pawar – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) जर म्हणत असतील की, हमासने (Israel-Hamas War) जे केले ते योग्य आहे; तर मग शरद पवारांनी आपली कन्या सुप्रिया सुळे (supriya sule) यांना हमासच्या बाजूने लढण्यासाठी गाझापट्टीत अवश्य पाठवून द्यावे.
जर पंतप्रधान मोदींनी इस्रायलला (Israel-Hamas War) पाठिंबा दिल्यावरही शरद पवारांनी आक्षेप घेत पंतप्रधान मोदी खऱ्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं म्हटलं आहे. त्यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसची नीतिमत्ता सिद्ध होते, असे प्रतिपादन आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांनी केले आहे.
इस्रायल-हमास युद्धाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यावरून राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भाजपची वागणूक महिलांप्रती अन्यायकारक आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सरमा यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘मला आश्चर्य वाटते कारण हिमंता बिस्वा सरमा यांचाही माझ्यासारखाच डीएनए आहे. तो कॉंग्रेसचा आहे आणि आम्हा दोघांमध्ये कॉंग्रेसचा डीएनए आहे.
तुम्हाला माहिती आहे की भाजपचे वर्तन महिलांबाबत अन्यायकारक आहे. पण सरमा यांच्याकडून मला अपेक्षा होत्या. महिलांबद्दलची त्यांची विचारसरणी कशी बदलली याचे मला आश्चर्य वाटते.
त्यांच्यावर भाजपचा बराच प्रभाव पडल्याचे दिसते. भाजपच्या आयटी सेलने आधी शरद पवार काय म्हणाले हे समजून घ्यावे आणि त्यांचे संपूर्ण विधान ऐकावे.
काय म्हणाले शरद पवार?
राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी इस्रायल-हमास युद्धाबाबत म्हटले होते की पॅलेस्टाईनची संपूर्ण जमीन आहे आणि इस्रायलने जमीन बळकावली आहे.
घर, जागा, जमीन हे सर्व पॅलेस्टाईनच्या मालकीचे होते पण आता इस्त्रायलने त्यावर ताबा मिळवला आहे. जे मूळचे इस्रायलचे आहेत त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी उभी आहे.
भाजपाची जोरदार टीका…
शरद पवारांच्या या वक्तव्याचा भाजपच्या अनेक नेत्यांनी निषेध केला. यामध्ये पियुष गोयल, नितीन गडकरी या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सरमांसारख्या लोकांना गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही.
कोणाच्या मनात द्वेष भरला आहे आणि कोणाला आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे काय हेच कळत नाही. पॅलेस्टाईन मुस्लिमांशी संबंधित आहे आणि भारतातही मुस्लिम द्वेषामुळे त्याचे समर्थन केले जात आहे. या युद्धामुळे भारतात तुष्टीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत.